Ad will apear here
Next
मनोज जोशी, वसंत नगरकर यांना ‘युवा’ पुरस्कार
युवा उद्योजक पुरस्काराबाबत माहिती देताना (डावीकडून) मंजुषा वैद्य, अजय कुलकर्णी, जयंत कुलकर्णी व श्रीकांत जोशी.

पुणे : शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) दहाव्या वर्धापन दिनानिमित्त, चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘युवा उद्योजक पुरस्कार’ श्रीपाद शंकर नगरकर सराफ पेढीचे वसंत नगरकर आणि सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत ‘सृजन युवा पुरस्कार’ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी यांना देण्यात येणार आहे, तर ‘कै. दिगंबर सर्वोत्तम कर्जतकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल पाठक आणि ज्ञानेश्वर त्रैमासिकाचे माजी संपादक रामचंद्र कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे’, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी मंजुषा वैद्य, श्रीकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अजय कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मनोज जोशी
हा ‘युवा’ पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी (दि. २० ऑक्टोबर २०१८) सायंकाळी ५.३० वाजता म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर व पितांबरी प्रॉडक्ट्सचे रवींद्र प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रसिद्ध निवेदक आणि अभिनेते राहुल सोलापूरकर, बडवे इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे, अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे जितेंद्र जोशी, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचे उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाविषयी 
युवा उद्योजक पुरस्कार वितरण सोहळा 
स्थळ :  शुभारंभ लॉन्स, म्हात्रे पुल
दिवस व वेळ :  शनिवार, २० ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० वाजता.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZOUBT
Similar Posts
‘ज्ञान-कौशल्येच रक्षण करतील’ पुणे : ‘विपुल ज्ञान आणि श्रेष्ठ विचारांच्या जोरावरच आपल्या पूर्वजांनी समाजाचा उद्धार केला आहे. आपल्या ‘डीएनए’मध्ये सृजनशीलता असून, तिचा योग्य उपयोग करण्यासाठी आपण उद्योगाकडे वळले पाहिजे. आरक्षणापेक्षा ज्ञान आणि कौशल्येच आपले रक्षण करणार आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे’, असे मत अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केले
बेला शेंडे, गणेश कुलकर्णी, केदार कुलकर्णी यांना ‘युवा’ पुरस्कार पुणे : ‘शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) अकराव्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘युवा उद्योजक पुरस्कार’ यंदा महाभृंगराज तेल कंपनीचे गणेश कुलकर्णी आणि केदार कुलकर्णी यांना, तर सृजन आर्ट
‘नव्या पिढीवर विश्वास, जबाबदारी टाकावी’ पुणे : ‘उद्योग उभारताना आणि वाढविताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी असायला हवी. नव्या पिढीवर विश्वास टाकून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, तर तेही जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. एखाद्या मुलाच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार आला, तर पालकांनी त्याला पाठबळ
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language